पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स दयावे : महाराष्ट्र करणी सेना
मुंबई (जगदीश काशिकर) : 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या दिवसी "महाराष्ट्र करनी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी उप मुख्यमंत्री मा.देवेन्द्र फडणविस याना पत्रकारांना सरकारने रिवाल्वर चे लायसन दयावे अशी पत्राद्वारे मागणी केली.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार यांना ओळखले जातो.
80% पत्रकार हे बिन पगारी व फुल अधिकारी या समाज सेवाच्या भावनेतून समाजसेवा करीत असतात.जगात सर्वाधिक हत्या या पत्रकारांच्या होतात म्हणून प्रत्येक पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स दिले पाहिजे.
भ्रष्टाचाराविरुद्ध आणि समाजातील अपप्रवृत्तीविरुद्ध लढत असल्याने त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पत्रकारांना सरकारने रिवाल्वर चे लायसन दयावे अशी मागणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे.
