विकमनी यांची व्यथा.!

अंबरनाथ (जगदीश काशिकर) : मी केवल विकमनी वय-२६ वर्ष. मी अंबरनाथ जि.ठाणे येथील चिकलोली गावात क्रिकेट फुटबॉल मैदान टर्फ चालवत होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथील पी.एस.आय. सुहास विटल पाटील यांनी मला टर्फ चालवण्यासाठी वारंवार हफ्ता देण्यास त्रास दिले व ५००००/- इतकी रकम हफ्ता वसूल केला. त्यानंतर मी त्यांना पैसे दिले नाही व मी हफ्ता देण्यास नकार दिला म्हणूनच त्यांनी मला शिवीगाळ, लाथा काठ्या बुक्कयांनी मारहाण केली. अश्लील भाषेत शिवीगाळ करून, रात्री क्रिकेट खेळण्यास आलेले खेळाडू व मला २००-३०० उठाबशा काढायला लावल्या व सीसीटिव्ही कॅमेरे ही बंद करण्यास सांगितले. परंतु मी चलाखीने ते बंद न करता यांची व यांच्यासोबत आलेले काही भागीदार , साथीदार या सर्वांची व्हीडिओ काढून ठेवली नंतर मी वारंवार तक्रार करूनही यांच्यावर कोणीच काहीच कार्यवाही केली नाही. गेल्या मे-२०२३ पासून मी वारंवार तक्रारी व अर्ज करूनही कोणीच दादही देत नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वारंवार भेटूनही कार्यवाही करण्यास विनंती केली परंतु आरोपी व तिकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे मित्र असल्याने त्यांनी आरोपीला वाचवण्याचे काम केले व माझ्यावर वारंवार अन्याय करून माझं आर्थिक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण केला आहे. 
या सर्वांनी मिळून सरकारी पदाचे दुरुपयोग केले व त्यानंतरही वारंवार मला त्रास देऊन सदरचे व्यवसाय मला बंद करण्यास भाग पाडले असून मी बेरोजगार झालो आहे. व सदरच्या उत्पन्नातून माझ्या उदरनिर्वाह चालू होता परंतु या अधिकाऱ्यानं मुळे माझं आर्थिक नुकसानही झाले असून मी कर्जबाजारी झालो आहे.नवतरुण पिढी जे देशाचं येणार भविष्य आहे त्यांनी हफ्ता / लाच दिल्या शिवाय कुठलाही व्यवसाय करू नये व तरुण , नवीन व्यावसायिक आहोत आम्ही काही छोटा अधिकृत व्यवसाय करत असलो तर येऊन मारहाण , शिवीगाळ केली व तरुण पिढी १५-२० मुलांना २००-३०० उठाबशा काढायला लावल्या , परंतु उद्या यांच्यामुळेच माझ्यासारखे दुसऱ्या कोणाचे आयुष्य खराब झाले तर मानसिक त्रासामुळे चरस, गांजा, ड्रॅग्स, दारू असे व्यसन करून तरुण पिढी चा भविष्य बरबाद होईल यांच्या अश्या कृत्यामुळे.
पोलिसांनी नागरिकांना मारहाण,शिवीगाळ, उठाबशा काढायला लावणे हे अधिकार त्यांना दिलेत का ??? नागरिकांसोबत अशी वागणूक करण्यासाठी यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदय / ठाणे पोलीस आयुक्त महोदय यांनी आदेश दिलेत का ??? हफ्तवसुली करण्याचे आदेश यांना कोणी दिले आहेत ??? जर हे लोकांना जागेवरच शिक्षा देत आहेत तर न्यायालय कश्यासाठी आहेत? सदर घटनेचे व्हीडिओ ऑडिओ पुरावे मी आपल्यासोबत शेअर करत आहे. त्यांनी आपली व्यथा फेसबुक द्वारे मांडली आहे.

हिन्दू धर्माला शाकाहारी धर्म बनू नका - अजय सिंह सेंगर

मुंबई : श्रेष्ठ जैन धर्म हा शाकाहार या सिद्धांतावर निर्माण झालेला आहे तर हिंदू धर्म हा आहारावर आधारित निर्मित धर्म नाही. हिन्दू हा शाकाहार धर्म असता तर जैन धर्म निर्माण झाला नसता. हिन्दू धर्माचा मूलभूत पाया कर्म व गुण यावर आधारित जीवन पद्धति निर्माण करने हा होय.हिंदू धर्माचा आणि आहाराचा कसलाही संबंध नाही असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी प्रतिपादन केले.पुढे सेंगर म्हणतात की,जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यमुळे देशात शाकाहार व मांसाहार असे वादंग निर्माण झालेले आहे.देशांतर्गत शत्रु हिंसक धर्म असताना हिन्दूचे शाकाहारीकरन झाले तर हिन्दू कमजोर होईल. कमजोर व्यक्ति राष्ट्र व धर्म रक्षण करू शकणार नाही, कारण कमजोर व्यक्ति मध्ये "क्षात्र तेज" निर्माण होऊ शकत नाही, प्रतिकार वृत्ती - लढाई वृत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य "क्षात्र तेज" मध्ये असते. हे क्षात्र तेज निर्माण होते तामसिक आहाराने.
शाकाहारी लोकांमध्ये दया, करुणा, अहिंसा, सहनशीलता आदि गुण सर्वाधिक असल्याने ते अत्याचारांना बळी पडतात, प्रतिकार करत नाही.मांसाहारी लोकांमध्ये राग व हिंसक प्रवृत्ति, क्रूरता अधिक प्रमाणामध्ये असल्याने राष्ट्र व धर्म रक्षणार्थ प्रतिकार करतात, प्राणपणाने लढतात राष्ट्र व धर्म रक्षण करतात. याच्यात "क्षात्र तेज" भरपूर प्रमाणात असतात.हिन्दू धर्माला शाकाहारी धर्म बनवू नका. शाकाहारी धर्माची आजची हालत बघा या धर्माची जनसंख्या पंधरा ते वीस लाख शिल्लक आहे. हिंदू धर्म हा मिश्रहारी आहे तो सात्विक, तामसिक राजसिक अशा मिश्र आहारी आहे. या धर्मातील अनेक मंदिरामध्ये मांसाहाराची नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा आहे आजही ती प्रथा परंपरा सुरू आहे.
हिन्दूच्या देवी देवताला शाकाहारी धर्माच्या श्रेणी मध्ये बसू नका. त्याचे राष्ट्रहिताय करिता जनीकरण होता कामा नये.शाकाहारने हिन्दूची प्रजनन व लैंगिक शक्ती कमी झाली म्हणून जनसंख्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट होत आहे, परिणामस्वरूप ही बाब हिरव्या धर्मा करता फायदेशीर आहे. तामसिक आहार-राजसिक आहार हा "क्षात्र तेज" करिता आवश्यक आहे. जो आहार क्षात्र तेज अर्थात सैनिक प्रवृत्ती जागृत करतो. अमेरिका, इंग्लंड, इजराइल, चीनच्या नागरीकात "क्षात्र तेज" प्रचंड प्रमाणात असल्याने या राष्ट्राकडे शत्रू वाकड्या नजरेने सुद्धा बघू शकत नाही. शाकाहार हा शरीराकरिता योग्य आहार म्हणता येणार नाही कारण शाकाहारमुळे आपल्या शरीराला कमी कॅलरीज प्राप्त होतात तर मांसाहार मुळे आपल्या सर्वाधिक कॅलरीज प्राप्त होतात याचा अर्थ मासाहारी व्यक्तींची कार्यक्षमता, लैंगिक क्षमता, प्रजनन क्षमता सर्वाधिक असते. शाकाहारी आहारामध्ये सर्वांत कमी ऊर्जा सेवन होते, शाकाहारी लोकांचा बॉडी मास इंडेक्सही कमी असतो,ब्रिटेन च्या मैनचेस्टर मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट च्या वैज्ञानिक यानी या बाबत निष्कर्ष काढला कि आहार चा मनुष्य च्या स्वभाव वर, गुणा वर भारी प्रभाव पडतो..
डॉ.कोवन याच्या पुस्तक 'सायन्स ऑफ ए न्यू लाइफ' मध्ये प्रजनन व लैंगिक कमतरता असलेल्या करिता काम - वासना उत्पन्न करने साठी तामसिक आहार फ़ायदेमन्द आहे. हिन्दूची प्रजनन क्षमता कमी होण्याचे कारण तामसिक आहार - राजसिक आहार तो त्याग करीत आहे. परिणामस्वरुप तो शारिरीक दुर्बल बनत आहे ही बाब धर्माबाबत घातक आहे. हजारों वर्षापासुन तो शाकाहार धर्माच्या शाकाहारी ने प्रभावित झाला म्हणून तो कमजोर झाल्याने आपला देश दोन वेळा गुलाम झाला. कारण कमजोर व दुर्बल व्यक्ती प्रतिकार करत नाही हा निसर्ग नियम आहे, हिन्दूचे सर्वाधिक साधु-संत -महंत हे शाकाहार धर्माच्या प्रचंड प्रभावा खाली आल्याने ते हिन्दूना तामसिक आहार त्याग करण्याचे व शाकाहारी बना असे उपदेश देत असल्याने हिंदू शारीरिक दृष्ट्या कमजोर बनत आहे, त्याचे "क्षात्र तेज" नष्ट होत आहे हे हिंदू धर्माच्या हिताकरिता व राष्ट्रहिता करिता दुःखद बाब आहे, देशा अंतर्गत हिंसक शत्रु असताना हिंदूंना अहिंसक व सात्विक बनवणे अयोग्य होय असे "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यानी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".