बल्लारपुर (का. प्र.) - बल्लारपूर शहरातील गांधी चौकात असलेल्या श्रीराम मंदिरात गोदंबा-रंगनाथजी कल्याण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
16 डिसेंबरपासून कल्याण उत्सवाला सुरुवात झाली आणि 12 जानेवारीला कल्याण उत्सवाची सांगता झाली.
या कल्याण उत्सव महिन्यात श्रीराम मंदिरात दररोज भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कल्याण उत्सव यशश्वी करण्याकरीता करुणा मालू, निर्मला काबरा, नीतू गुप्ता, प्रेमलता काबरा, संतोष मुंधडा, मंगला कडेल, विद्या गहेरवार, पूजा खटोड, प्रीती खटोड, उमा सोमाणी, लक्ष्मी सारडा, तृप्ती खंडेलवाल, सोनिका मालू, सुनिधी काबरा, जगदीश काबरा , सीताराम सोमाणी, राजू मुंधडा, परेश पटधरिया, नरेश मुंधडा, सुरेंद्र काबरा, गौरव अटल, समर्थ काबरा, मनीष मालू, अनु मातंगी, गोपाल खंडेलवाल, राकेश सोमाणी, अजय गुप्ता, नवनीत सारडा यांनी अथक परिश्रम घेतले.
